श्रीरामाच्या नावांचा उगम व वैशिष्ट्ये
CKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती
Page 1 of 1
श्रीरामाच्या नावांचा उगम व वैशिष्ट्ये
श्रीरामाच्या काही नावांचा उगम
अ. राम :
आ. रामचंद्र :
३. वैशिष्ट्ये
अ. सर्वार्थाने आदर्श
अ १. आदर्श पुत्र :
अ २. आदर्श बंधु :
अ ३. आदर्श पति :
अ ४. आदर्श मित्र :
अ ५. आदर्श राजा :
अ ६. आदर्श शत्रु :[b]
[b]आ. धर्मपालक :
अ. राम :
हे नाव रामजन्माच्या आधीही प्रचलित होते. रम्-रमयते म्हणजे (आनंदात) रममाण होणे, यावरून राम हा शब्द बनला आहे. राम म्हणजे स्वत: आनंदात रममाण असलेला व दुसर्यांना आनंदात रममाण करणारा.
आ. रामचंद्र :
इ. श्रीराम : 'रामाचे मूळ नाव `राम' एवढेच आहे. तो सूर्यवंशी आहे. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.
श्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. भगवंताचे षड्गुण याप्रमाणे आहेत - यश, श्री (शक्ति, सौंदर्य, सद्गुण, वगैरे), औदार्य, वैराग्य, ज्ञान व ऐश्वर्य. दुष्ट रावणाचा वध करून व लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वत:चे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला `श्रीराम' म्हणू लागले. वाल्मीकिरामायणात रामाला देव नव्हे, तर नरपुंगव म्हणजे `नरातील श्रेष्ठ' असे म्हटले आहे. (हनुमानाला कपिपुंगव म्हटले आहे. फक्त पुंगव या शब्दाचा अर्थ आहे बैल.) आपल्या नावाच्या आधी लावण्यात येणार्या `श्री'च्या नंतर पूर्णविराम असतो. ते `श्रीयुत्'चे संक्षिप्त रूप आहे. श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या नावांमध्ये `श्री'च्या नंतर पूर्णविराम नाही. आपण श्रीयुत् असतो, म्हणजे `श्री'युक्त असतो, म्हणजे आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट श्रीराम व श्रीकृष्ण हे स्वत:च भगवंत होते.
३. वैशिष्ट्ये
अ. सर्वार्थाने आदर्श
अ १. आदर्श पुत्र :
रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने `दु:ख करू नका' असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला चौदा वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो व पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.
अ २. आदर्श बंधु :
अजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.
अ ३. आदर्श पति :
श्रीराम एकपत्नीकाती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता असतांना त्याने दुसरी पत्नी न करता सीतेची प्रतिकृति आपल्या शेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने अनेक राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्वभूमीवर श्रीरामाचे एकपत्नीकात प्रकर्षाने जाणवते.
अ ४. आदर्श मित्र :
रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात मदत केली.
अ ५. आदर्श राजा :
प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून श्रीरामाने आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने `कौलिनभीते न गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्त: ।' (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.), असा मार्मिक श्लोक लिहिला आहे.
अ ६. आदर्श शत्रु :[b]
रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ``मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.''
[b]आ. धर्मपालक :
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला `मर्यादा-पुरुषोत्तम' म्हणतात.
CKP :: हिंदू धर्म :: हिंदू संकृती
Page 1 of 1
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum
|
|
Mon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin
» आयुर्वेद:कोहळा
Sat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin
» आयुर्वेद आवळा
Sat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin
» आयुर्वेद: तुळस
Thu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin
» CKP Fish Curry
Tue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin
» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
Fri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे
» Various Origins of CKP's
Fri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin
» मन एव मनुष्याणाम्
Thu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे
» CKP आडनावे
Sat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin